नंदादीप म्हणजे काय ? नवरात्रीमध्ये का लावला जातो देवाजवळ अखंड दिवा ; वाचा महत्व आणि कारण

1698 0

 

खाद्यतेलाचा विशेषकरुन तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा तेज तत्त्वाचं प्रतिनिधित्व करतो. नवरात्रीच्या काळात आणि इतर सणाच्या काळात वातावरणात तेज तत्त्वाचे प्रमाण अधिक आढळते म्हणूनच तेज तत्त्वाचे तरंग, लहरी अखंड दिव्याकडे आकर्षित होतात. अखंड दीपामुळे या लहरी आपल्या घरात सतत प्रक्षेपित होतात. तसेच ब्रम्हांडात प्रक्षेपित झालेले शक्ती तत्त्व (आदिशक्तीचे तत्त्व) या दिव्याकडे खेचले जाते.

या कारणाने घरातील, मंदिरातील सात्त्विकता वाढते व अनिष्ट, नकारात्मक शक्तींचा नाश होतो म्हणूनच अखंड दीपाला नवरात्रीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रीत तेज तत्त्वाचे/तेज लहरींचे आधिक्य वातावरणात असते, तेलाचा/तुपाचा दिवा तेज तत्त्वाचा प्रतिनिधित्त्व करत असल्याकारणाने या लहरी अखंड दीप ज्या घरात असेल तिकडे तेज तत्त्व सतत प्रक्षेपित करून वलय निर्माण करतात.

नंदादीप शक्यतो मातीच्या दिव्यामध्येच लावावा. कारण मातीच्या दिव्यात सात्त्विक तरंग प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. या नंदादीपामुळे घरातील नकारात्मक उर्जेचा नाश होतो व घरात चैतन्य, उल्हास निर्माण होऊन वातावरण प्रसन्न राहाते.

नंदादीप किंवा देवापुढे रोज लावला जाणारा दिवा हा खाद्यतेलाचा किंवा तुपाचा असावा. गाईचे तूप हे सर्वात जास्त सात्त्विक असते, तिळाचे तेल पण सात्त्विक असते. तेल रजोगुणी असते. यामध्ये गायीचे तूप सर्वात जास्त सात्त्विक व श्रेष्ठ असते. ज्यांना शक्य असेल त्यांनी तुपाचा दिवा नक्की लावावा. निदान तिळाच्या तेलाचा तरी लावावा. जर शक्यच नसेल तर साध्या खाद्यतेलाचा दिवा लावावा.

अखंड दीप हा धार्मिक पूजेचा एक भाग आहे. जर वारा, दिव्याची काजळी किंवा दिव्यातील तेल संपून गेल्या कारणाने दिवा विझला तर देवीची क्षमा मागून पुन्हा दीप प्रज्वलित करण्यास शास्त्रात कोणतीही आडकाठी नाही. या नंदादीपासमोर बसून देवी स्तुती, सार्थ दुर्गा सप्तशतीचे वाचन करणे, देवी नामजप करणे इष्ट मानले जाते.

दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रात कार्यरत असणाऱ्या तेजाधिष्ठीत लहरींच्या वेगात अखंडत्व व कार्यात सातत्य असल्याने या लहरी तेवढ्याच ताकदीने ग्रहण करणाऱ्या अखंड प्रज्वलित दीपरूपी माध्यमाचा उपयोग करून वास्तूत तेजाचे संवर्धन केले जाते.

 

Share This News

Related Post

ज्येष्ठ छायाचित्रकार मुकुंद भुते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - November 9, 2022 0
पुणे : ज्येष्ठ छायाचित्रकार मुकुंद भुते यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वाराणसीमध्ये कुटुंबासोबत गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका…

मोठी बातमी! मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

Posted by - April 20, 2023 0
दिल्ली: राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला मोठा दणका बसला असून मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे मराठा समाजाला इसीबीसी…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये आला नवा ट्विस्ट; ‘त्या’ कॉलने वाढवला सस्पेन्स

Posted by - June 20, 2023 0
पुणे : दर्शना पवार प्रकरण (Darshana Pawar Murder Case) सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. काही दिवसांपूर्वी MPSC परीक्षेत उत्तीर्ण…
Devendra-Fadnavis-Raj-Thackeray-Eknath-Shinde-2

युतीचा फॉर्म्युला ठरला? राज ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल

Posted by - May 31, 2023 0
मुंबई : मुंबईमधून (Mumbai) एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला रामराम, समाजवादीकडून राज्यसभेवर जाण्याची तयारी

Posted by - May 25, 2022 0
नवी दिल्ली- काँग्रेसच्या जी-23 मधील प्रमुख बंडखोर असलेल्या कपिल सिब्बल यांनी पक्षाला रामराम केला आहे. ते आता राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *