पुणे : अकलूज मधील अजब गजब लग्नामुळे महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. अतुल याने रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींशी एक साथ लग्न केलं. कारण या दोघी बहिणी एकमेकांपासून वेगळं राहू शकत नाही. जन्म , खेळणे , शिक्षण आणि नोकरी देखील या बहिणींनी एक साथ केली. आजारपणामध्ये दोघी बहिणी आणि आईला आधार देणाऱ्या अतुलवर या दोघींपैकी एकीचं प्रेम जडलं पण एकीच लग्न केलं तर दोघींमध्ये दुरावा येईल म्हणून या जुळ्या बहिणींनी अतुलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर अकलूजमध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता. पण आता थेट महिला आयोगाने देखील दखल घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कारवाई बाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे.तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत1/2
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 4, 2022