नवी दिल्ली : कंझावाला हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री घडलेला हा भयावह अपघात अद्यापही कोणी विसरू शकल नाही. असं असतानाच आता या आरोपींना एक धक्कादायक खुलासा केला आहे.
अंजलीला बारा किलोमीटर फरपटत नेलं होतं. सुरुवातीला या आरोपींनी सांगितलं की, गाडीतील म्युझिकमुळे तरुणीचा आवाज त्यांच्यापर्यंत आला नाही. परंतु आता या आरोपींनी मान्य केल आहे की, अंजली गाडीखाली अडकली असल्यास त्यांना माहीत होतं. मात्र भीतीमुळे त्यांनी गाडी थांबवली नाही धक्कादायक म्हणजे मृतदेह अडकलेला असताना तो रस्त्यावर पाडण्यासाठी त्यांनी चार वेळा यु टर्न देखील घेतला.
मध्येच गाडी वेगात पळवली. हरियाणाकडे गेले तर चेकिंग होऊ शकते, हे माहीत असल्यामुळे त्यांनी 13 किलोमीटरच्या रस्त्यावरच अनेक वेळा न्यूटन घेऊन 40 ते 50 किलोमीटरवर गाडी पळवल्याचं त्यांनी सांगितल आहे. या धक्कादायक खुलासा नंतर संपूर्ण देश हादरला आहे.