मुंबई : तब्बल तीन महिन्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जामीनावर सुटले आहेत. ईडीच्या कार्यप्रणालीवर न्यायालयाने देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरूनच सुषमा अंधारे यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, “ईडीची खरंच गरज आहे का ? यावर आता चर्चा होणं, संशोधन होणं आणि सभागृहांमध्ये देखील हा प्रश्न विचारण्याची गरज आहे असे म्हटले आहे. आज संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुषमा अंधारे यांनी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
![](https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-11-at-12.48.51-PM.jpeg)