डोक्यावरुन खूप पाणी गेलंय, आता बघाच; भाजपचे साडेतीन नेते कोठडीत असतील – संजय राऊत (व्हिडिओ)

178 0

नवी दिल्ली- आम्ही खूप सहन केलं आम्ही, बरबाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय ? आता बघाच, असा खणखणीत इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. उद्या शिवसेना पत्रकार परिषद घेऊन उद्या सर्व गोष्टींची उत्तरे दिली जातील असे राऊत यांनी म्हटले आहे.

या पत्रकार परिषदेला पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असणार आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेते ‘आज हे मंत्री जातील, ते मंत्री जातील’ अशा धमक्या देत आहेत. मात्र, या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. भाजपच्या त्या साडे तीन नेत्यांना त्याच कोठडीत राहण्याची व्यवस्था होत आहे. ‘हमाम मै सब नंगे होते है’ हे भाजपने लक्षात घ्यावं. असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Share This News

Related Post

राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे, संजोग वाघेरे यांना डच्चू

Posted by - February 12, 2022 0
पिंपरी- पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. याच…

महाविकास आघाडीचा महामोर्चा; उद्धव ठाकरे महामोर्चासाठी रवाना

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महापुरुषांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ आज मुंबईतील क्रुडास कंपनीपासून भायखळ्यातील टाइम्स ऑफ इंडिया च्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार असून मोर्चाच्या…

सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - August 14, 2022 0
मुंबई:- शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठा…
Solapur Crime

Solapur Crime : दुसऱ्यांसाठी मदत करायला गेला आणि नियतीने तरुणाचा घात केला; काय घडले नेमके?

Posted by - July 13, 2023 0
सोलापूर : सोलापूर (Solapur Crime) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एका नवविवाहित तरुणाचा विजेचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *