समीर वानखेडे यांना मोठा झटका, ठाण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून बार परवाना रद्द

114 0

नवी मुंबई- एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांना मोठा दणका मिळाला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द केले आहे.

ठाण्याचे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राजेश नार्वेकर यांची याबाबत सहा पानी आदेश दिला आहे. यात वानखेडेंनी 1997 मध्ये बारचा परवाना घेताना खोटी कागदपत्रे सादर केल्याचे म्हटलं आहे. महाराष्ट्र प्रतिबंध कायद्याच्या कलम 54 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते.समीर वानखेडे हे अल्पवयीन असताना त्यांना बारचा परवाना देण्यात आला होता असा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बाजवली होती. बारचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय 21 वर्षे आवश्यक आहे मात्र, असे असतानाही समीर वानखेडे यांना अल्पवयीन असताना बारचा परवाना मिळाला होता. या कारवाईमुळे समीर वानखेडेंना एक मोठा झटका बसला आहे.

Share This News

Related Post

उद्धव ठाकरे निवडणुकीचे रणशिंग फुंकणार ! दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातच पहिली सभा, ठाकरे गटाकडून सभेची जोरदार तयारी

Posted by - March 2, 2023 0
नाशिक : शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरी आणि राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई, ठाणे वगळता उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहेत.…

धन्यवाद गुजरात! लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला! गुजरात विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट

Posted by - December 8, 2022 0
गुजरात : गुजरातमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे मोठे यश मिळाले आहे. गुजरातमध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः मुख्यमंत्री असताना जेवढे यश…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेवर संजय राऊत यांनी दिले स्पष्ट संकेत

Posted by - May 14, 2022 0
मुंबई- मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मुख्यमंत्री काय…

पाच पैकी तीन राज्यात सत्ता स्थापनेकडे भाजपाची वाटचाल, गोव्यात संघर्ष तर पंजाबमध्ये सफाया

Posted by - March 10, 2022 0
दिल्ली- उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकाल हाती येऊ लागले आहेत. 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4…

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्थापन केली संघटना; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

Posted by - May 9, 2022 0
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवी संघटना स्थापन केली असून या संघटनेचे एसटी कर्मचारी जनसंघ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *