कोल्हापूर – संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर संभाजीराजे छत्रपती हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सविस्तर बातमी थोड्याच वेळात…
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने सहावा उमेदवार देण्याचे जाहीर केले. तसेच या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्याची घोषणा केली जाणार असतानाच या राजकीय नाट्याला कलाटणी मिळाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संभाजीराजे कोल्हापूरहून मुंबईला निघाले आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्री आणि संभाजीराजे याची भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संभाजीराजे शिवबंधन बांधून शिवसेनेकडून उमेदवारी स्वीकारतील की अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावाची चर्चा
राज्यसभेसाठी शिवसेना कोणाच्या नावाची घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यात संजय पवार यांच्या नावाचीही चर्चा आहे. यावर बोलताना संजय पवार म्हणाले की, माझ्या नावाची चर्चा असल्याचं मला माध्यमांकडूनच कळालं. मला संधी मिळाली तर नक्की चांगलं काम करून दाखवू’
‘मी ३० वर्ष शिवसेनेसोबत काम केलं. आम्ही मातोश्रीला नेहमी दैवत म्हणून पाहिलं आहे. काही मिळावं यासाठी कधीही काम केलं नाही. १५ वर्ष नगरसेवक, १४ वर्ष जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख म्हणून काम पाहिलं, तालुका प्रमुख म्हणून काम पाहिलं. सर्वसामान्य शिवसैनिकाला उच्चस्तरावर नेणारा हा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात पद देण्याबाबत काही असेल तर देतील. नाही दिलं तरी शिवसैनिक म्हणून काम करण्याची तयारी’ असंही यावेळी संजय पवारांनी स्पष्ट केलं.