राज्यसभेसाठी अशी होते निवडणूक, जाणून घ्या सविस्तर माहिती

262 0

नवी दिल्ली – महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी 10 जूनला मतदान होत आहे. ही निवडणूक प्रक्रिया कशी होते याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये असते. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जुन ते ऑगस्टमध्ये अनेक राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे या जागांसाठी काही नवे चेहरे चर्चेत आहेत, तर काहींनी पुन्हा एकदा दावेदारी ठोकली आहे. सध्या महाराष्ट्रात देखील राज्यसभेच्या जागांवरून राजकारण पेटले आहे. अलीकडेच राज्यसभेचा कार्यकाळ संपलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना पुन्हा एकदा राज्यसभा सदस्य होण्याची इच्छा आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना साद घातली. मात्र शिवसेनेने शिवबंधन बांधल्याशिवाय राज्यसभेसाठी पाठिंबा मिळणार नाही अशी अट त्यांना घातली. संभाजीराजे यांनी त्याला नकार देऊन अपक्ष लढण्याचा निर्धार केला.

त्यानंतर शिवसेनेने आपल्या कोट्यामधील दोन जागांपैकी एक जागेवर संजय राऊत यांना तर दुसऱ्या जागेवर कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. एकूणच या निवडणुकीला खूप महत्व आले आहे.

अशी होते निवडणूक

राज्यसभेत एकूण सदस्य संख्या २५० आहे. तथापि, यामधील १२ सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतात. उर्वरित २३८ सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व करतात. यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागांचे वाटप केले जाते. राज्यातील लोकसंख्येच्या आधारावर कोणत्या राज्याला किती जागा मिळणार हे निश्चित केले जाते. अर्थातच, ज्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे त्या राज्याला अधिक जागा मिळतात. उत्तर प्रदेश सर्वात मोठे राज्य असल्याने त्या राज्याला सर्वाधिक ३१ जागा मिळतात.

राज्यसभा सदस्याची निवड करताना एक प्रतिनिधी एका वेळेला एकाच उमेदवाराला मतदान करू शकतो. तथापि, अपवादात्मक परिस्थितीमध्ये मत ट्रान्सफर सुद्धा होऊ शकते. समजा, ज्या उमेदवाराला मत देण्यात आलं आहे तो उमेदवार विजयी झाला असल्यास ते मत ट्रान्सफर केलं जातं. आणि दुसऱ्या उमेदवाराला इतकी कमी मते मिळाली आहेत त्यामध्ये तो विजयी होऊ शकत नाही अशावेळी मत ट्रान्सफर होऊ शकतं. त्यासाठीच प्राथमिकता ठरवून उमेदवारांना 1 पासून 4 पर्यंत नंबर दिले जातात.

पहिल्यांदा प्राथमिकता असलेल्या मतांनाही एक नंबर निश्चित केला जातो. म्हणजेच याचा अर्थ असा की, एका उमेदवाराला विजयासाठी किती आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे हे राज्यसभेच्या किती जागांवर निवडणूक होत आहे यावर निश्चित केले जाते. यासाठी जो फॉर्म्युला असतो तो असा असतो की राज्यातील एकूण आमदारांच्या संख्येला राज्यसभेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या आकड्याला १ जोडून भागले जाते. यामध्ये पहिल्या नंबरने जो आकडा येतो त्याला तेवढी मते मिळवावी लागतात. उत्तर प्रदेशात एकूण आमदारांची संख्या ४०३ आहे. त्या ठिकाणी ११ जागेवर निवडणूक होत आहे, तर फॉर्म्युला असा असेल 403/ [11+1] +1 = 34 म्हणजेच पहिल्या पसंतीची ३४ मते मिळवावी लागतील.

 

Share This News

Related Post

Eknath And Uddhav

Shivsena News : ठाकरे गटाचा आणखी एक नेता शिंदे गटात जाणार? ‘त्या’ ट्विटने वेधले लक्ष

Posted by - June 27, 2023 0
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला (Shivsena News) आज एक धक्का बसणार असल्याचं सूचक ट्विट शिवसेनेचे (Shivsena News) ठाकरे…
Maharashta Politics

Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण खूप खालच्या स्थरावर गेले…

#HEALTH WEALTH : मुलांनाही होऊ शकतात हृदयाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Posted by - March 9, 2023 0
आजच्या युगात मुलांना काही गंभीर आजार होऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी हृदयाशी संबंधित आजार प्रामुख्याने वयोवृद्ध आणि वृद्धांमध्ये दिसून येत…
Pillu Bachelor

Pillu Bachelor : ‘पिल्लू बॅचलर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! सायली संजीव, पाठकबाई अन् पार्थ भालेराव करणार कल्ला

Posted by - December 4, 2023 0
मुंबई : वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा याची अनुभूती देणारा बहुचर्चित ‘पिल्लू बॅचलर’ सिनेमाचा (Pillu Bachelor) ट्रेलर रिलीज झाला…

National Crime Records Bureau : महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार राजस्थानात ; महाराष्ट्र 4 क्रमांकावर 

Posted by - July 22, 2022 0
मुंबई : देशात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यात राजस्थान प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *