TOP NEWS SPECIAL REPORT : राजू शेट्टी महाराष्ट्राच्या राजकारणातील विशेषतः शेतकरी चळवळीतील मोठं नाव आंदोलन असो वा मोर्चे राजू शेट्टी हे राज्याच्या राजकीय सारीपाटावर कायमच चर्चेत राहिलंय. एक चळवळीतील कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य आमदार ,खासदार ते आता पुन्हा शिवार नेमका कसा राहिला आहे राजू शेट्टी यांचा जीवनप्रवास ते पाहूयात…
राजू शेट्टी यांचा जन्म 1 जून 1967 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात झाला. शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी यासाठी शेट्टी यांनी आजवर अनेक आंदोलन केली आहेत. राजू शेट्टी सुरुवातीला लोकवर्गणीतून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. जिल्हा परिषदेची मुदत संपण्यापूर्वीच शेट्टी शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्यांनी राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला.
पुढे 2009 च्या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला. 2014 मध्येही राजू शेट्टी लोकसभेवर निवडून आले होते. विशेष म्हणजे या सर्व निवडणुका शेट्टी यांनी लोकवर्गणीतून लढवल्या आणि जिंकल्यादेखील.. मात्र 2019 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांच्यामुळे शेट्टी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी चला उभा भूमिपुत्रांनो नवा एल्गार करू आजपासून संघर्षाचा नवा अध्याय सुरू म्हणत आपली नवी संघर्षमयी राजकीय कारकीर्द शेतकऱ्यांसाठी सुरूच ठेवली.
2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या भाजपा, शिवसेना व अन्य मित्रपक्षांसह झालेल्या महायुतीत शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील झाली होती. मात्र त्यानंतर महायुतीशी फारकत घेत शेट्टी महाविकास आघाडी मध्ये सामील झाले होते. मात्र 5 एप्रिल 2022 ला कोल्हापुरात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आणि एकला चलो रे चा नारा.
आज घडीला राज्याच्या राजकारणात राजू शेट्टी नावाचा एकमेव नेता आहे. जो शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुख दुःखात अडीअडचणीला धावून जातोय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढतोय. शेवटी जाताजाता…
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची …!
– संकेत देशपांडे
रिपोर्टर,TOP NEWS मराठी