काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही ‘भारत जोडो’ यात्रा काँग्रेस साठी महत्त्वाची मानली जात आहे.
मात्र ही ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असताना तब्बल 24 वर्षांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी ची निवडणूक होत असून या निवडणुकीमध्ये गांधी परिवारातील एकही सदस्य रिंगणामध्ये नाही. या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि शशी थरुर हे अर्ज भरण्याची शक्यता असून G23 गटाचे मुकुल वासनिक आणि मनीष तिवारी यांच्याकडे देखील संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे.
मात्र एकीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा गेहलोत यांनी जाहीर करतानाच मी राजस्थानमध्ये ही कायम असेल असा दावा केल्यानं पक्षाचे अध्यक्षपद आणि मुख्यमंत्रिपद अशा दोन्ही बाजूंसाठी आपण सक्षम असल्याचं गेहलोत सांगत असले तरी मात्र, त्यांना राज्याचा मोह सोडावा लागेल, असे सध्याचे चित्र आहे.
असं असतानाच आता मुख्यमंत्रीपदावरून राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून आतापर्यंत 92 आमदारांनी आपले राजीनामे राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी.पी.जोशी यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. रविवारी (25 सप्टेंबर) संध्याकाळी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेदरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला जाण्यापूर्वी या 92 आमदारांनी आपले राजीनामे तो पूर्ण केले असून जर गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर गेहलोत गटाचाच मुख्यमंत्री व्हावा अशी या आमदारांची मागणी तर दुसरीकडे सचिन पायलट यांचे समर्थक आमदार त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत.
त्यामुळे आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अशोक गेहलोत यांच्यासमोर राजस्थान राखण्याचं मोठं आव्हान असून सचिन पायलट यांची नाराजी पाहता अडीच महिन्यापूर्वी महाराष्ट्रात जसा राजकीय भूकंप घडला तसा राजकीय भूकंप राजस्थानात घडून सचिन पायलट हे राजस्थानचे एकनाथ शिंदे ठरणार का ? हे पाहणं आता महत्तवाचं ठरणार आहे
– संकेत देशपांडे
रिपोर्टर TOP NEWS मराठी