गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना किंवा तसा विचार आला तरी राज्य सरकारच्या 104 हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास तेथून समुपदेशन केलं जाऊ शकत.
पुणे शहरात आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. धकाधकीच जीवन, नातेसंबंधातील तणाव, बेरोजगारी, कौटुंबिक हिंसाचार, छळ, आजार, नैराश्य, व्यावसायिक नुकसान ही आत्महत्येची प्रमुख कारणं आहेत.
काही जण आत्महत्येचा प्रयत्न करतात. कुटुंबीय तसेच नातेवाईक, मित्र किंवा इतरांच्या सतर्कतेमुळे त्यांना वाचवण्यात यश येते. मानसिक संतुलन बिघडल्याने देखील असा प्रयत्न काही जणांकडून सातत्याने केला जातो. यासाठी 104 हा हेल्पलाइन नंबर राज्य शासनाने सुरू केला आहे.
प्रेरणा प्रकल्पाच्या हेल्पलाइनवर केवळ फोनवरून संबंधितांचे समुपदेशन होते. प्रत्यक्षात मदत पाहिजे असल्यास महापालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयात धाव घ्यावी लागते. त्यानंतर मानसोपचारतज्ञ समुपदेशन करतात.
- शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये 2015 पासून प्रेरणा प्रकल्प राबवण्यात येत आहे
- या प्रकल्पाअंतर्गत नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना 104 क्रमांकावर समुपदेशन करून त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो
- या प्रकल्पात पुण्याचा समावेश नाही तरीही हे मार्गदर्शन उपयोगी ठरत आहे