मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) मोठी गर्दी आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी मागच्या 12 तासांपासून सुमारे 300 हून अधिक प्रवाशी अडकले आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यानं विमानाचं उड्डाण होऊ न शकल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
व्हिएतनामच्या (Vietnam) Viet Jet कंपनीच्या विमानात हा बिघाड झाला असून हे विमान मुंबईहून व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहराकडं निघालं होतं. यादरम्यान हा प्रकार घडला आहे. विमानाच्या उड्डाणाला उशीर होणार असतानाही एअरलाईननं (Airline) आमच्या राहण्याखाण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही असा आरोप एका प्रवाशाने केला आहे.
एअरलाईननं प्रसिद्ध केलं निवेदन
मुंबई ते हो ची मिन्ह साठी जाणारं विमान रात्री 1 वाजता उड्डाण करणार होतं. पण विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यानं या विमानाचं उड्डाण 20.30 वाजता अर्थात दुसऱ्या दिवशी रात्री साडे आठ वाजता रिशेड्युल करण्यात आले आहे. यामुळे इतरही काही विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.