नागपूर- नवनीत राणा आणि रवी राणा यांची दोन मुले आईवडिलांपासून २१ दिवस दूर होते. राणा दांपत्याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यामुळे आईवडिलांना भेटण्यासाठी ही मुले अतिशय आतुर झाली होती. आईवडिलांना भेटण्यासाठी आज त्यांची मुलगी आणि मुलगा दिल्लीला गेले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठाण प्रकरणी राणा दांपत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. १२ दिवस रवी राणा आणि नवनीत राणा जेलमध्ये होते. त्यानंतर मुबई स्तर न्यायालयाने दोघांचा जामीन मंजूर केला. मानेच्या त्रासामुळे नवनीत राणा या जेलमधून सुटका होताच लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या.
त्यानंतर राणा दांपत्याने दिल्ली गाठत ठाकरे सरकारच्या विरोधात दिल्ली दरबारी गाऱ्हाणे घातले. या सर्व काळात राणा दांपत्याचा मुलगा आणि मुलगी आपल्या घरी होते. २१ दिवस आईवडिलांपासून दूर असलेल्या मुलांना आईवडिलांची आठवण येत होती. अखेर आज दोन्ही मुलांनी आईवडिलांना भेटण्यासाठी दिल्ली गाठली.