मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्याला सुरुवात केली असून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतुद करण्यात अली असल्याचे सांगितलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून आता ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजना जाहीर करण्यात आली आहे, या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेत प्रत्येक शेतकऱ्यासाठी सहा हजार रुपयांची वाढीव तरतूद राज्य सरकारकडून केली जाणार आहे.
राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेमुळे आता केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज हवामानात बदल झाल्यामुळे अनेक समस्यांनी अन्नदाता शेतकऱ्याला ग्रासले आहे. अशा स्थितीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याला जोडूनच आता राज्य सरकारही शेतकरी महासन्मान निधी योजना राबवेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. आता त्यात राज्य सरकारकडूनही आणखी 6 हजार रुपये, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12 हजार रुपयांचा निधी दिला जाईल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज हवामानात बदल झाल्यामुळे अनेक समस्यांनी अन्नदाता शेतकऱ्याला ग्रासले आहे. अशा स्थितीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याला जोडूनच आता राज्य सरकारही शेतकरी महासन्मान निधी योजना राबवेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. आता त्यात राज्य सरकारकडूनही आणखी 6 हजार रुपये, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12 हजार रुपयांचा निधी दिला जाईल. अशी माहिती अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.