अहमदनगर : अहमदनगर येथे 14 डिसेंबरला हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडला. या मोर्चाला मोठ्या संख्येने नगरकरांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान या मोर्चामध्ये कालीचरण महाराज हे देखील उपस्थित होते. यावेळी पुन्हा एकदा कालीचरण महाराज हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
यावेळी ते म्हणाले की, डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा, आणि हे पाणी दुसऱ्या दिवशी मुलीला प्यायला द्या… मग बघा डोकं ठिकाणावर येईल, आणि सर्व भूत -प्रेत, मंत्र-तंत्र बाहेर येईल. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.