जितेंद्र आव्हाड प्रकरण : शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; “राजकीय हेतूने अशा कारवाया टाळाव्यात..! वाचा सविस्तर

205 0

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड ढवळून निघाल आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे ते शांत होण्याचं नाव देखील घेत नाही. हर हर महादेव चित्रपटा बाबत जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला. ठाण्यातील चित्रपटगृहामध्ये सुरू असलेले हर हर महादेव चित्रपटाचे प्रदर्शन देखील त्यांनी बंद पाडलं, आणि त्यानंतर एका प्रेक्षकाला मारहाण देखील झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली. त्यानंतर जामीन देखील मिळाला. हा वाद थंड होतो न होतो तोच भाजपच्या एका महिला कार्यकर्त्यांन जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांची चांगलीच बाजू लावून धरली आहे. 72 तासांमध्ये दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा देखील सादर केला. परंतु यावर राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिका-यांनी नाराजीच व्यक्त केली आहे. तर आता थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच फोन लावून ‘राजकीय हेतूने अशा कारवाया टाळाव्यात, अशा कारवाया करणे योग्य नाही. त्यामुळे समाजात वेगळा संदेश जातो आहे.’ असे सुनावले. तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई कोणत्याही राजकीय हेतूने करण्यात आलेली नसून, एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे म्हटले असल्याचे समजते. एबीपी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.

Share This News

Related Post

वरंध घाट बंदचे आदेश झुगारणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी प्रशासनाची अशीही युक्ती

Posted by - July 23, 2023 0
पुणे- पुण्याहून भोर मार्गे कोकणात जाण्यासाठी भोर तालुक्यातील वरंधा घाट हा जवळचा मार्ग आहे. त्याशिवाय वर्ष विहार करण्यासाठी या घाटात…

#Crime News : कोल्हापुरातील जयंती नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह; हत्या की घातपात, तपास सुरू …

Posted by - January 28, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरात आज एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे . कोल्हापुरातील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ एका महिलेचा…

जरिया संस्थेकडून वादक अमान आणि अयान अली खान बंगेश यांच्या कार्यक्रमाचे आयोजन – दिपक भानुसे यांचे बासरीवादन

Posted by - February 15, 2023 0
‘जरिया’ या संस्थेने निधीसंकलनासाठी वादक अमान आणि अयान अली खान बंगेश यांच्या सरोद वादनाचा आणि दिपक भानुसे यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम आयोजित…

FIRE CALL : कर्वे रास्ता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तळमजल्यावर आगीची घटना PHOTO

Posted by - August 17, 2022 0
पुणे : कर्वे रास्ता नाळ स्टॉप जवळील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तळमजल्यावर आगीची घटना घडली असल्याचे समजते आहे .…

जनकल्याण योजना : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ग्रामीण शेळी-मेंढी पालनातून उद्योजकता विकास ; योजनेचे स्वरुप , अटी , लाभ

Posted by - September 12, 2022 0
योजनेचे स्वरुप ग्रामीण शेळी- मेंढी क्षेत्रामध्ये उद्योजकता विकास करणे, शेळी मेंढी व्यवसाय मॉडेल विकसित करणे, असंघटित क्षेत्राला संघटित क्षेत्रात आणून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *