पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे . दरम्यान एकीकडे आंदोलने , आरोप प्रत्यारोप होत असताना अनेक महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा आणि निर्णय होत आहेत . दरम्यान आज औरंगाबाद , उस्मानाबाद आणि नवी मुंबई यांच्या नामांतराचा ठराव देखील मंजूर झाला आहे.
त्यामुळे औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर , उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील विमानतळ असल्यास मंजुरी मिळाली आहे. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावर आक्षेप घेण्यात आला होता . राज्य शासनाने घेतलेला नामांतराचा निर्णय हा केवळ राजकीय हेतूने घेतला असल्याचा आरोप करण्यात येत होता .
मुंबई उच्च न्यायालयामध्ये 1998 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आला असल्याचे याचिकेमध्ये नमूद करण्यात आले होते. तथापि हा निर्णय शासनाने 2001 रोजी रद्द केला . हा निर्णय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या विरोधात आहे . फक्त राज्यामध्ये सत्तांतर झाले म्हणून असे नामांतराचे निर्णय घेता येणाऱ नाहीत. नामांतराचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे , असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.