नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे. पहिल्या दिवसापासून हिवाळी अधिवेशनाचे वातावरण चांगलेच तापले आहे. ते सीमा प्रश्नावरून…! हे वातावरण अद्याप देखील थंड झाले नसून, सीमा प्रश्न बाबत ठराव आणणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटले आहे. हा ठराव उद्या विधिमंडळात मंजूर होणार आहे.
कर्नाटकनच्या विधानसभेत महाराष्ट्राविरोधी ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज विरोधकांकडून कडाडून विरोध झाला. यानंतर सीमाप्रश्नाबाबत ठराव आणणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे. हा ठराव उद्या विधिमंडळात मंजूर केला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण इंच इंच जागेचा विचार करू. सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्र सरकार समोर आपण सीमावरती भागातील नागरिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी जे करायचं असेल ते करू. आपलं ठराव आणण्याचं ठरलं होतं. आज तो ठराव आपण मांडला होता. मुख्यमंत्री आज दिल्लीला केंद्राच्या कार्यक्रमासाठी गेले. त्यामुळे ते आज जर आले तर आज किंवा उद्या हा ठराव आपण मांडू या संदर्भात आपण तर सुभरही मागे हटणार नाही… असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.