मुलींनो…! आंतरधर्मीय विवाह करतात ? श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

722 0

मुंबई : जग बदलते आहे तसे तरुणांचे विचार देखील बदलत आहेत. आज अनेक आंतरजातीय आणि अंतरधर्मीय लग्न अगदी सहज होतात. यामुळे समाजातील अंतर कमी होऊन माणसं जवळ येत आहेत. ही गोष्ट जरी खरी असली तरी श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला आहे. लव जिहाद बाबत सरकारने योग्य पावले उचलावीत, नवीन कायदा बनवावा अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जर तुम्ही अंतरधर्मीय लग्न करत असाल तर राज्य सरकार थेट मुलीच्या घरी जाऊन याविषयी विचारपूस करणार आहेत.

एखाद्या मुलीने जर अंतरधर्मीय लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल राज्य सरकार त्या मुलीच्या घरी जाऊन चौकशी करणार आहे. यातून ही मुलगी या लग्नानंतर सुरक्षित राहू शकते का? या दृष्टीने देखील योग्य ती शहानिशा सरकारच करणार आहे. त्यानंतर देखील लग्नानंतर तरुणीला काही त्रास झाला तर तिची मदत देखील सरकार करणार असल्याची माहिती राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

या निर्णयानंतर नक्की समाजातून काय प्रतिक्रिया उमटतात, या निर्णयाचा नक्की कसा फायदा होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. यासह हा निर्णय केवळ मुलींबाबतच घेण्यात आला आहे. अर्थात मुलींच्याच घरी जाऊन शहानिशा करण्यात येणार आहे. आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या मुलांच्या घरी शहानिशा केली जाणार नाहीये. त्यामुळे देखील या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटत आहेत.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी : पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्वीकारला पदभार

Posted by - December 16, 2022 0
पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आज पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. पुण्याचे मावळते पोलीस…

प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Posted by - June 2, 2022 0
पिंपरी – प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून आज गुरुवारी (दि. 2) डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्‍टरांनी काही…
Satara Death

लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला; पत्नीचा जागीच मृत्यू

Posted by - June 12, 2023 0
सातारा : आजकाल कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये आपल्या…
Mumbai Crime News

Mumbai Crime News :काजलचे घराबाहेर सूत जुळलं अन् सासू-नवऱ्याचा केला गेम; पण…

Posted by - October 19, 2023 0
मुंबई : आजकाल पैसा हाती आला कि रक्ताची नातीदेखील एकमेकांच्या जीवावर (Mumbai Crime News) उठतात. याच पैशांपायी गडचिरोलीमध्ये एका सुनेनं…
Eknath Shinde Farm

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी पत्नीसह शेतीकामात व्यस्त

Posted by - June 23, 2023 0
सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या सातारा येथील दरे या त्यांच्या मूळ गावी विश्रांतीसाठी आलेले आहेत. दोन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *