मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. “आज जगतगुरू तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचा दिवस अर्थात तुकाराम बीज आहे. भागवत धर्मात आदराचं स्थान असलेल्या आणि आपल्या विचाराने महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या जगतगुरू तुकाराम महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुकोबारायांनी जो संदेश दिला आहे, ‘टिकवावे धन, ज्याची आस करी जन’, या तत्वाला अनुसरून राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे.
शेततळे विस्तार योजनेचा विस्तार होणार
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणार
शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये मदत करणार
केंद्र सरकार 6 हजार राज्य सरकार 6 हजार रुपये देणार
शेतकऱ्यांच्या पिक विमा चा हप्ता राज्य सरकार भरणार
मच्छीमारांसाठी 279 कोटींची तरतूद
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार 300 कोटी देणार
शिव उत्सवासाठी अडीचशे कोटींची तरतूद
86 हजार कृषी उत्पन्न तात्काळ जोडणी
कोकणातील सिंचनासाठी विशेष योजना आखणार
मेंढी शेळीपालनासाठी दहा हजार कोटी बिनव्याजी कर्ज
धान उत्पादकांना प्रतिहेक्टरी 15000 ची मदत
सेंद्रिय शेतीसाठी एक लाख कोटींची तरतूद
मराठवाड्यासाठी घर घर जल योजना राबवणार
घरघर जल योजनेसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव
17 लाख कुटुंबीयांना नव्यानं नळ जोडणी मिळणार
नाशिक आणि नागपूर उद्यानांसाठी Mविविध विकास प्रकल्पांसाठी 36 हजार कोटी
गोपीनाथ मुंडे अपघात योजना लागू करणार
जलयुक्त शिवार 2 योजना राबविणार
राज्याच्या विकासासाठी मित्र संस्थेची स्थापना
कोकणातील पाणी नदीजोड प्रकल्पाने मराठवाड्याकडे नेणार
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची स्थापना करणार
चौथे सर्वसमावेशक महिला धोरण राबविणार
आशा सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ
अंगणवाडी सेविकांना 5 हजार 500 रुपये
700 नवीन आपला दवाखाना सुरू करणार
आरोग्य विभागासाठी 3 हजार 520 कोटींची तरतूद
लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर महामंडळ
राज्यातील आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव निधी
मोदी आवास 4 लाख नवीन घरं बांधणार
समृद्धी महामार्गाचं 88 % काम पूर्ण