मुंबई : टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुमच्या फास्टटॅगची KYC अपूर्ण असेल तर 31 जानेवारीनंतर FASTag बंद करण्यात येणार आहे. नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे. One Vehicle One FASTag या मोहिमेअंतर्गत फास्टटॅगच्या वापरण्याच्या चांगल्या अनुभवाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 31 जानेवरीपर्यंत फास्टटॅगची केवायसी पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. असं न केल्यास त्या फास्टटॅग धारकांना ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे किंवा तो फास्टटॅग बंद केला जाईल.
तसंच कारवर एकापेक्षा जास्त फास्टटॅग असणाऱ्या वाहनचालकांचं अकाऊंट ब्लॅकलिस्ट केलं जाणार असल्यांचही नॅशनल हायवे अथॉरिची ऑफ इंडियाने सांगितलं आहे. केवायसी पूर्ण न केल्यास फास्टटॅग बंद होईलच पण वाहनचालकांच्या खिशावरही ताण वाढणार आहे. वाहनचालकांना दुप्पट टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे NHAI ने सर्व फास्टटॅग धारकांना KYC पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
फास्टटॅग म्हणजे काय?
टोल नाक्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि महामार्गावर विनाअडथळा वाहतुकीसाठी ‘फास्ट टॅग’ प्रणालीला सुरु करण्यात आली. फास्टटॅग स्टिकरसारखा असून तो कारच्या पुढच्या काचेवर चिटकवला जातो. फास्टटॅग हा डिजिटल स्टिकर असून ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर काम करतं. फास्टटॅग काढल्यानंतर टोलची रक्कम त्या वाहनचालकाच्या प्रीपेज अकाऊंट किंवा बँक अकाऊंटमध्ये थेट कापली जाते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल
Munnawar Rana : लोकप्रिय शायर मुन्नावर राणा यांचं निधन
Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात