रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यकारीणीची 3 सप्टेंबरला निवडणूक ; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राहणार उपस्थित

149 0

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाची मुंबई प्रदेश अध्यक्ष आणि कार्यकारीणीची निवडणूक येत्या दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता सांताक्रूझ पूर्व कालिना येथील भीम छाया सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकरिणीची निवडणूक नुकतीच पुण्यात संपन्न झाली असून राज्य अध्यक्षपदी सोलापुरातून राजा सरवदे यांची तर रिपाइं च्या राज्य सरचिटणीस पदी मुंबईतून गौतम सोनवणे यांची निवड झाली आहे. त्यामुळे रिपाइंचे मुंबई अध्यक्षपद सध्या रिक्त असून संपूर्ण मुंबई प्रदेश कार्यकारीणी ची निवडणूक येत्या दि.3 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या देश भरातील सर्व राज्य आणि जिल्हा कमिटी बरखास्त केल्याची घोषणा रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांनी मागील महिन्यात केल्या नंतर नवीन कमिटी निवडण्यासाठी रिपाइं च्या पक्षातंर्गत निवडणुका सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्य कमिटीची निवडणूक झाल्यानंतर राज्याची राजधानी असणाऱ्या आणि रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबईच्या कार्यकारीणी निवडणुकी कडे रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष पद कुणाला मिळणार याकडे सर्व राज्यातील रिपाइं कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपाइं च्या मुंबई प्रदेश कार्यकरिणी निवडणूकीसाठी मुंबईतील सर्व वॉर्ड; तालुका आणि जिल्हा स्तरीय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा रिपाइं च्या कोणत्या नेत्याच्या हाती जाते हा रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे दि.3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपाइं कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहतील.

Share This News

Related Post

Ratnagiri Crime

धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 20, 2023 0
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.…

.. तर राज्यावर लोडशेडिंगचे संकट, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार यांचा इशारा

Posted by - April 8, 2022 0
पुणे- कोळसा तुटवड्यावर येत्या दोन ते तीन दिवसात तातडीने उपाययोजना न झाल्यास राज्यावर लोडशेडिंगचे संकट येऊ शकते असा इशारा मदत…
pune crime

Pune Crime : अजबच ! लग्नास नकार दिल्याने चक्क महिलेने तरुणालाच पळवलं

Posted by - June 28, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Crime) MPSC ची गुणवंत विद्यार्थिनी दर्शना पवारची हत्या एकतर्फी प्रेमातून तिच्याच मित्राने केल्याचा प्रकार समोर आला…

उद्यापासूनच केरळमध्ये मान्सून दाखल होणार ‘असानी’ चक्रीवादळाचा मान्सूनवर काय परिणाम होणार ?

Posted by - May 10, 2022 0
मुंबई- सध्या बंगालच्या उपसागरात ‘असानी’ चक्रीवादळाचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मात्र या वादळाचा मान्सूनवर…
Rishibhai Shinde

आ. शशिकांत शिंदेंचे भाऊ ऋषीभाई शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश

Posted by - June 4, 2023 0
सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ आणि माथाडी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *