नवी दिल्ली- राज्य निवडणूक आयोगानं सप्टेंबर आणि ॲाक्टोबर महिन्यात निवडणूका घेण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार असून या सुनावणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जून जुलै मध्ये होणार कि पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये होणार याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले होते. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रक्रिया सुरु केली तरी ३१ जुलै नंतरच प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे शक्य होणार आहे.
पावसाळ्यात निवडणुका घेणं अशक्य असून प्रभाग रचनांसाठी लागणार वेळ मतदार याद्या, वॉर्ड रचना यासाठी देखील वेळ लागणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या सुनावणीदरम्यान काय निर्णय होणार ? हे पाहणं महत्त्वाचं असेल