अहमदनगर : वेदांता प्रकल्प गुजरातकडे गेला. जर वेदांता प्रकल्प महाराष्ट्रामध्येच राहिला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला असता. पण हा प्रकल्प गुजरातकडे गेल्यामुळे विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर टीकाटिप्पणी होत आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी मात्र स्थिर भूमिका मांडली आहे.
वेदांत प्रकल्पाविषयी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “हा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जाणं ही चांगली गोष्ट नाही. पण वेदांता पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटले आहे. वेदांता प्रकल्पाला महाविकास आघाडीने तळेगाव येथे जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांना ती जागा आवडली देखील होती. जागेसह त्यांना सर्व सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता गुजरातमध्ये जी जागा वेदांतासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती जागा त्यांना आवडलेली नाही. याच कारणामुळे वेदांता प्रकल्प पुन्हा एकदा महाराष्ट्रात येऊ शकतो. आणि म्हणूनच हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे.” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.