#DHULE : काजू समजून खाल्ल्या चंद्रज्योतच्या विषारी बिया; धुळ्यात 7 चिमुरड्यांना विषबाधा

928 0

धुळे : काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे 7 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात घडली आहे. काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्यामुळे 7 चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड गावातील आदिवासी वस्तीत लहान बालकांनी खेळता खेळता काजू समजून चंद्रज्योतच्या बिया खाल्ल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांना शासकिय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात साध्य उपचार सुरु आहेत.

आपल्या घरा जवळ खेळत असताना मुलांनी चंद्रज्योतच्या झाडाखाली पडलेल्या बिया दिसल्या खेळता खेळता काजू समजून मुलांनी या विषारी बिया खाल्ल्या मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागला. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. मुलांची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं.

यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर 6 मुलं बेशुद्ध झाली असून त्यांच्यावर सध्या बाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्यांनी प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांना देखील त्रास होत असल्याने त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी : पुणे रेल्वे स्टेशनला निनावी फोन; रेल्वे स्टेशनला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त, वाचा सविस्तर

Posted by - January 14, 2023 0
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. रेल्वे स्टेशनला एक निनावी फोन आला. या अज्ञात…

प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून मंजूर

Posted by - April 12, 2022 0
मुंबई- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. बोगस…

PHOTO : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; दोन वर्षांच्या कोविड संकटानंतर ३१ हजार महिलांची उपस्थिती

Posted by - September 1, 2022 0
पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर…

महत्वाची बातमी ! महाराष्ट्र निर्बंधमुक्त, गुढीपाडवा साजरा करा जल्लोषात

Posted by - March 31, 2022 0
मुंबई- राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी. कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध हटवण्यात आले असून यंदा नागरिकांना गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, ईद जल्लोषात साजरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *