पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती. या प्रकरणानंतर या शाई फेक करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हत्या करण्याचा प्रयत्न करणे कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासह अकरा पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच निलंबन देखील करण्यात आला होता.
परंतु या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणावर टीकेला राज्य सरकारला सामोरे जावं लागलं. यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील अटक असलेल्या आरोपींवरील कलम 360 मागे घेण्याचा आदेश देण्यात आला असून, 11 पोलिसांचं निलंबन देखील मागे घेण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.