पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील एका कार्यक्रमांमध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी हजेरी लावली आहे. तिथे पत्रकारांशी संवाद साधत असताना सध्याचे राज्य सरकार पडणार या विषयावर त्यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, सध्याचे राज्य सरकार हे पडणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र हे सरकार जाणार नाही. जाणार असते तर ते कशाला आले असते. हे सरकार यापुढे वीस वर्ष राहणार आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार बदलण्यात एक्सपर्ट आहेत. सगळ्यांना सत्ता मिळत नाही, तशी मंत्रिपद ही सर्वांना संधी मिळत नाही. मात्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की, मंत्रीपदी संधी न मिळालेल्या आमदारांनी नाराज होऊन हे सरकार पडेल अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र सरकार पडणार नाही असा ठाम विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
तसेच नरेंद्र मोदी यांना पत्रकारांनी गुजरात येथून दिल्ली येथे पोहोचवलं पत्रकारांनीच मोदींना मोठा सपोर्ट केला. मला देखील दिल्ली माहीत नव्हती. मला दिल्लीपर्यंत पोहोचवण्यात देखील पत्रकारांचा हात आहे. असे यावेळी रामदास आठवले यांनी वक्तव्य केला आहे.