दिल्ली : दोन वर्ष कोरोनाने जगभरात अक्षरशः थैमान घातलं . कोरोनाने देशभरात अनेक जीव घेतले , संपूर्ण जनजीवन अस्थिर करून टाकलं होतं. अनेक महिने पूर्णपणे घरात स्वतःला बंद करून घेण्याची वेळ सर्वांवर आली होती . या सर्व संकटातून आता बाहेर पडलो आहोत असे कुठेतरी वाटत असताना पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे .
ही मास्क सक्ती दिल्लीमध्ये करण्यात आली आहे . दिल्लीतील वाढती रुग्णसंख्या पाहता आप सरकार कडून सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती पुन्हा एकदा लागू करण्यात आली आहे . मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे . तर खाजगी चार चाकी गाडीने प्रवास करत असताना देखील मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , ऑगस्ट महिन्यामध्ये दिल्लीत कोरोनामुळे 40 जण मृत्यूमुखी पडले आहेत . वाढत धोका पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे . ‘संख्या वाढत आहे ,तरी त्यांनी होण्याचं कारण नाही’ असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटल आहे.