कानपूर : आतापर्यंत आपण नवयुवकांचा प्रेम आणि त्यांनी प्रेमात केलेल्या चित्रविचित्र गोष्टी ऐकल्या असतील. पण या चार-पाच नवयुवकांच्या टोळक्याने अजबच गोष्ट केली आहे. स्वतःचे आणि प्रेयसीचे महागडे शौक पूर्ण करण्यासाठी या 18 ते 20 वर्षाच्या नवयुवकांनी थेट चोरीमारी करायला सुरुवात केली.
या गोष्टीची या मुलांच्या घरच्यांना कानोकान खबर नव्हती. काहींचे वडील हे रिक्षा चालक आहेत, तर काहींचे वडील हे एखाद्या फॅक्टरीमध्ये कामगार म्हणून काम करतात. त्यांच्या घरच्यांना ही गोष्ट तेव्हा समजली जेव्हा पोलिसांनी या सर्वांना फोन करून बोलावून घेतलं.
तर झालं असं की, या तरुणांनी आपल्या मैत्रिणींची इच्छा पूर्ण करण्यासाठी चोरी करायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मोबाईल ,दुचाकी आणि अगदी पिस्तूल देखील त्यांच्याकडे आढळून आले आहेत. पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून नऊ मोबाईल, दोन दुचाकी, पिस्तूल आणि दोन काडतुसे देखील जप्त केले आहेत. या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पोलिसांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला.
प्रत्येक व्यक्तीला सुधारण्याची एक संधी मिळायलाच हवी त्यामुळे या पोलिसांनी या मुलांच्या पालकांना बोलून त्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला.कदाचित आता मुलांवर कसे लक्ष ठेवावे, त्याना कसे अपप्रवृत्तींपासून लांब ठेवावे हे पालक शिकतील आणि मुले वाईट मार्गी जाणार नाहीत.