मुंबई : महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा SSC आणि HSC चा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला होता. आज CBSE च्या निकालाची विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे. शुक्रवारी सकाळी बारावीचा CBSE चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी ( cbse.gov.in ) or ( cbseresults.nic.in ) वरून निकाल तपासू शकता.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,”CBSE चा निकाल जाहीर होण्यास कोणताही विलंब झालेला नाही. दोन बोर्डाची टर्म परीक्षा 15 जून रोजी संपली , आणि त्यानंतर तपासणीचे काम सुरू झालं. CBSE च्या निकालामध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये 94.54% मुली उत्तीर्ण झाल्या असून 91.25% मुले उत्तीर्ण झाली आहेत.