कोल्हापूर : कोल्हापुरातील कणेरी मठ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. शिळे अन्न खायला घातल्याने गायींचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरातील कणेरी मठ येथे घडली आहे.
कोल्हापुरातील कणेरी मठ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. शिळे अन्न खायला घातल्याने 9 गायींचा मृत्यू झाला तर 23 गायींवर सध्या उपचार सुरु आहेत.
आतापर्यंत 9 गाई दगावल्याची पशु उपयुक्त यांनी माहिती दिली आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.