पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई यांच्या नायगाव जन्मगावी आज अनेकांनी हजेरी लावून अभिवादन केले. पुण्यातील अभिवादन कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी हजेरी लावली. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सवाल केला आहे.
महिलांनी कसे कपडे घालावेत या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ” महिलांनी कोणते कपडे घालावेत यासारख्या बाष्फळ विषयांवर चर्चा होते. पण गंभीर विषयांकडे लक्ष दिल जात नाही ही चर्चा करता नाही विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांनाच टार्गेट केलं जातं असा, आरोप करून देशात नॉन इशूज आणि बुलशिट इशू काढले जातात. तर कधी बुरखाच का घालता असा सवाल केला जातो. म्हणून आता आतातायीपणा करायचा कधी तुम्ही कपडे का घालत नाही, म्हणून आता आतातायीपणा करायचा हे योग्य नाही. केतकी चितळे असो किंवा सगळ्यात तत्सम महिला त्यांच्यावर कधी टीकेची राळ उठत नाही. किंवा देवेंद्रजी कधी सभागृह बंद पडणार नाहीत असा टोला देखील अंधारे यांनी फडणवीस यांना लगावला आहे.