मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून होत आहेत. दरम्यान, “माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप अब्दुल सत्तार यांनी आज एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानाने राजकीय गोटात एकाच खळबळ उडाली आहे.
शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगात आहेत. टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आरोप होत आहे. दरम्यान यावर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे.
यात काही माझ्या पक्षातील असू शकतात. तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणीतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु असल्याचं सत्तार यांनी म्हंटल आहे.