पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा एकदा पंजाब राज्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता राज्यातील जनतेला घरबसल्या रेशन मिळणार आहे. आप सरकारने ‘रेशन, आपके द्वार’ योजना सुरू केली असून, त्याद्वारे आता लोकांना घरी बसून रेशन विभाग उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंजाबमध्ये नोकरभरती सुरू करणाऱ्या भगवंत मान यांनी आज पुन्हा एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. भगवंत मान सरकारने पंजाबमध्ये आता राशनची डोअर स्टेप डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे मान सरकार राज्यातील जनतेला घरपोच राशन देणार आहे. त्यामुळे पंजाबमधील नागरिकांना राशन दुकानावर रांगा लावण्याची गरज पडणार नाही. हे काम रेशनिंग अधिकारी करणार आहेत.
आज़ादी के 75 साल बाद भी हमारे लोग कतारों में खड़े हैं। आज हम ये सिस्टम बदलने जा रहे हैं।
अब हमारी बुजुर्ग माताओं को राशन के लिए घंटो लाइन में नहीं लगना पड़ेगा। किसी को अपनी दिहाड़ी नहीं छोड़नी पड़ेगी।
आज मैंने फैसला लिया है कि आपकी सरकार आपके घर राशन पहुंचाएगी। pic.twitter.com/GxgCcCDfPw
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 28, 2022
मुख्यमंत्र्यांनी आज एक व्हिडिओ संदेश जारी केला आणि ते म्हणाले की लोकांना रेशन मिळवण्यासाठी लांबच्या रांगेत उभे राहावे लागते आणि गरीब लोकांना अनेक वेळा रेशन मिळवण्यासाठी आपली रोजची मजुरी सोडावी लागते, ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. रोजची कमाई करणारा गरीब माणूस आपली रोजची मजुरी सोडण्याच्या स्थितीत नाही. कधी-कधी माता-भगिनींना दुरून रेशन आणावे लागते हे पाहिले, पण आता विभागातील लोक तुमच्या घरी रेशन देणार असा निर्णय सरकारने घेतला आहे, घरी येण्यापूर्वी घरी आहेत की नाही हे लोकांना विचारले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. पीठ आणि डाळीही तुम्हाला घरापर्यंत देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आतापर्यंत अनेक घोषणा केल्या आहेत. माजी आमदारांचे वेगळे पेन्शन बंद केल्यानंतर त्यांच्या नव्या घोषणेबाबत चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणतात की, त्यांच्या सरकारच्या 10 दिवसांच्या कार्यकाळात 10 मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.