राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरू होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

143 0

मुंबई- राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे. तर अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाची नेमकी परिस्थिती कळेल. त्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असं त्या म्हणाल्या. बारावीच्या निकालासंदर्भात बोलताना त्यांनी एका वाक्यात सांगितलं की, बारावीचा निकाल लवकरच लागेल. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, एक क्रांतिकारी पाऊल शालेय शिक्षण विभाग टाकत आहे. महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि स्वजीवी प्रोग्राम या कार्यक्रमाचं उद्घाटन आज करण्यात आलं. एचसीएलकडून 20 ते 25 हजार विद्यार्थ्यांना यांच्याकडून प्रशिक्षण देणार आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइनही ट्रेनिंग दिली जाणार आहे. विज्ञान शाखेत गणित विषय घेऊन 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी या कार्यक्रमात प्रवेश घेऊ शकणार आहेत. फक्त प्रशिक्षणच नाही तर नोकरीशी सुद्धा विद्यार्थ्यांना सांगड ही कंपनी घालून देणार आहे.

Share This News

Related Post

कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Posted by - July 6, 2022 0
मुंबई: मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. अचानक झालेल्या भेटीमुळे…

पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटींचं अंदाजपत्रक सादर

Posted by - March 7, 2022 0
पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटीचं अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केलं. यावेळी अंदाजपत्रकात पुणे शहरात नव्याने सहा उड्डाणपूल होणार…
RASHIBHAVISHY

कर्क राशीसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

Posted by - October 19, 2022 0
मेष:-आज काही समश्यांचा सामना करावा लागेल,मन अस्वस्थ राहील,कामावर लक्ष केंद्रित करा. वृषभ:-जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल, व्यवसाय वृध्धी च्या दृष्टीने नवीन…

BIG NEWS : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक; काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

Posted by - November 11, 2022 0
ठाणे : ठाण्यातील मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विधियाना मॉलमधील हर हर महादेव चित्रपटाचा शो…

मनाची आंघोळ : नात्यांमध्ये दुरावा येतोय…? फक्त प्रेम नाही तर ‘ही’ भावना देखील आहे महत्त्वाची…

Posted by - August 12, 2022 0
मनाची आंघोळ : नातेसंबंध कोणतेही असो त्यामध्ये दुरावा येणं हे क्लेशदायक असतं मग कारण कोणतेही असो मतप्रवाह विरुद्ध असणे स्वभाव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *