मुंबई : सध्या अब्दुल सत्तार हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत अपमान जनक शिवी देऊन अब्दुल सत्तार यांनी मोठे संकट ओढवून घेतले. कारण त्यानंतर राजकीय वर्तुळातूनच नाही तर सामान्यांनी देखील त्यांच्या अर्वाच्य भाषेवर नाराजी व्यक्त केली.
परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची चांगलीच कान उघाडणी केल्याचं समस्त आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना “बोलताना जबाबदारीने बोला, जबाबदारीने वागा, जबाबदारीने काम करा..यापुढे वादग्रस्त वक्तव्य नको. ” अशा भाषेत कानू काढणी केली आहे.
तर पुन्हा असं वादग्रस्त वक्तव्य केलं तर मंत्रिपद देखील धोक्यात येईल. असा देखील इशारा दिला असल्याचं समजत आहे. त्यासह यापुढे अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधू नये. आणि या प्रकरणावर कोणतेही भाष्य करू नये अशा सूचना देखील दिल्या आहेत.