मानसिक आरोग्य : लग्न ठरलंय ? पण मनाची घालमेल होते; अनामिक भीती वाटते मग, ‘या’ टिप्स वाचाच

216 0

सध्या लग्नसराई सुरू आहे. जे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत, त्यांना एक अनामिक भीती वाटत असते. ज्यांची लग्न झाली आहेत. मग अगदी प्रेमविवाह का असेना, त्यांनी देखील ही अनामिक भीती अनुभवली असेल. ही भीती नेमकी काय असते ? हे देखील बोलता येत नाही. त्यामुळे नववधू आणि नवरदेव स्वतःच्याच लग्नामध्ये कुठेतरी विचारमग्न वाटतात. चला तर मग तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमची ही अनामिक भीती दूर होईल.

1. प्रेमविवाह असो किंवा कुटुंबाने ठरवलेले लग्न… तुम्ही आता कोणाचे तरी कायमचे होणार आहात त्यामुळे ज्या व्यक्तीसोबत तुम्ही पुढे आयुष्य घालवणार आहात त्याला त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही बाजूंनी स्वीकार करा.

2. तुमच्या जोडीदाराशी अधिकाधिक बोला. काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही केवळ स्वतःशीच बोलता. काही गोष्टी अशाही असतात की ज्या तुम्ही स्वतःशी बोलणं देखील टाळता. ती गोष्ट एकदा तरी होणाऱ्या जोडीदाराशी बोला… मन मोकळ करा, बरं वाटेल !

3. अनेकांना शरीर संबंध याविषयी देखील भीती वाटत असते. विशेष करून ही भीती महिलांना जास्त वाटते. यासाठी लग्न झालेल्या एखाद्या मैत्रिणीची मदत घ्या . मुलांनी लग्न झालेल्या मित्राशी संवाद साधा.

4. सामान्यतः लग्नाच्या आधी सर्वच मुली आणि मुलं उशिरा उठणे, निवांत आवरणे, घरातील मोठी काम न करणे, फक्त स्वतःचे आवरणे आणि नोकरी व्यवसाय याकडेच लक्ष देणे, हे करत असतात. लग्नानंतर एकमेकांची जबाबदारी आणि कुटुंबाची जबाबदारी देखील कमी जास्त प्रमाणात तुमच्या खांद्यावर येणार आहे. याचे दडपण घेण्याची आवश्यकता नाही. थेट बोला ! तुमच्या सवयी सांगा आणि थोडं बदला देखील आयुष्यात बदल होणार आहेत. पण त्याचे दडपण घेण्याची आवश्यकता नाही.

५. आई वडील आणि कुटुंबापासून लांब जाण्याची भावना नववधूसाठी त्रासदायक ठरते. लग्न ठरणे ते लग्न होऊन सासरी जाण्यापर्यंत मनामधलं हे हुरहुर पाठवण्याच्या वेळी फुटते. अश्रू थांबवू नका. पण हे लक्षात घ्या की, आता जग खूप जवळ आलं आहे. आणि लोकांची मानसिकता देखील त्यामुळे जेव्हा तुम्हाला आई-वडिलांची आठवण येते. तेव्हा तुम्ही फोनवर बोलणे किंवा थेट जाऊन भेटणे हे अगदी सहज करू शकता हे मनाला सांगा.

६. तुम्ही जाड असाल, अगदी बारीक असाल, एखादा आजार असेल, सावळे असाल,तुम्हाला टक्कल असेल… मुला-मुलींना आपल्या चुकीच्या बाजूकडेच अशावेळी अधिक लक्ष दिले जाते. आणि त्यामुळे देखील दडपण येते. पण लग्न ठरले आहे. म्हणजे आपल्या जोडीदाराने आपल्याला मनापासून आहेत असे स्वीकारले आहे. हे लक्षात घ्या, तुम्ही परफेक्ट असलेच पाहिजे असे नाही, हो त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता!

Share This News

Related Post

मनसेचा वर्धापन दिन उद्या पुण्यात राज्यभरातून हजारो मन सैनिक पुण्यात दाखल होणार

Posted by - March 8, 2022 0
महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी…

करवा चौथ 2022 : पतीच्या दीर्घायुष्यासाठी आज संध्याकाळी अशी करावी पूजा , चंद्रोदय ,महत्व, मान्यता, मुहूर्त वाचा सविस्तर

Posted by - October 13, 2022 0
करवा चौथ हा विवाहित हिंदू स्त्रियांद्वारे पाळल्या जाणा-या सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, समृद्धीसाठी आणि सुरक्षिततेसाठी एक दिवसाचा…

HEALTH WEALTH : किडनी स्टोनचा त्रास दूर करण्यासाठी फक्त रोज सकाळी प्या ‘हा’ ज्यूस

Posted by - January 12, 2023 0
किडनी स्टोनमुळे अनेकांना प्रचंड वेदनांना सामोरे जावे लागत. किडनी स्टोनला सर्वात चांगला उपाय आहे ते योग्य प्रमाणात पाणी पिणे. पण…

BIG NEWS : मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाच्या आमिषाने थेट आमदारांचीच 100 कोटींची फसवणूक ; 4 आरोपी गजाआड

Posted by - July 20, 2022 0
मुंबई : राज्यात सध्या नवे सरकार स्थापन झाले असून , नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वच जण लक्ष ठेवून आहेत. मंत्रिमंडळ…

घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवतेय ? फॉलो करा या वास्तू टिप्स …

Posted by - August 17, 2022 0
वास्तू टिप्स : वाढती शहरे व फ्लॅट संस्कृती मुळे संपूर्ण वस्तू शास्त्रा प्रमाणे घर मिळणे आता कठीण झाले आहे,पण खालील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *