अहमदनगर (शिर्डी) : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी भाविकांची रिघच लागलेली असते . अशातच पावसानं राज्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्यामुळे शिर्डीतील भाविकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून येते आहे. अहमदनगर जिल्ह्याला पावसाने काही दिवसापासून चांगलंच झोडपून काढल आहे.
रविवारी शिर्डीमध्ये तुफान पाऊस कोसळला . त्यामुळे गावात आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. मंदिर परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचले असून भाविक या पाण्यातूनच साई दर्शनासाठी जात आहेत . गावातील लोकांना मोठ्या प्रमाणावर असुविधा सहन करावी लागते आहे .
पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्या कारणाने शिर्डीतील प्रमुख भागांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे . तर अनेकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून , शिर्डीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.