मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि एकनाथ शिंदेंचा हात धरून अनेक नेत्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फायरि झडत असताना शिंदे गटातील नेते प्रतापराव जाधव यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केला आहे.
यावेळी प्रतापराव जाधव म्हणाले की शरद पवार यांच्या इशाऱ्यावरच संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे असा खळबळजनक आरोप करून त्यांनी निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात राहिलेले आमदार आणि खासदार शिंदे गटात येथील आणि ठाकरे यांचा पक्ष रिकामा होईल अशा कटू शब्दात ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.