तुम्हाला माहित आहे का, भयानक स्वप्न का पडतात ? त्यावर काही उपाय असतो का ? तज्ज्ञ सांगतात…

425 0

आज पर्यंत तुम्हाला अनेक वेळा जाणवले असेल, दिवस छान जातो, कोणतीही अनुचित घटना घडत नाही. पण तरीही रात्री शांत झोप लागल्यानंतर अचानक एखादं स्वप्न खूप भयानक पडत. अगदी तुम्ही डचकूनही उठता ,बऱ्याच वेळ त्या स्वप्नाचा विचार करतात आणि थोड्यावेळाने ते स्वप्न होतं म्हणून पुन्हा झोपून घेता. पण असं का होत असावं ?

तुम्ही जर कधी शांतपणे या गोष्टीचा विचार केला तर तुम्हाला जाणवेल की आज पर्यंत तुम्हाला जी भीतीदायक स्वप्न पडले आहेत ती तुमच्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या घटनेचा धागा दोरा धरूनच पडलेली स्वप्न असतात. जसे की तुम्ही कधीतरी एखादी कथा वाचली असेल, एखादा चित्रपट, एखादी भयानक घटना कोणाकडून ऐकली असेल, एखादा अपघात, हत्या या गोष्टी पाहिल्या असतील. अशावेळी मेंदू अनेक गोष्टींचा गुंता करून एक स्वप्न तुम्हाला पडते.

याला जोड असते ते तुमच्या इच्छा आकांक्षांची… तुम्हाला बराच वेळा एखाद्या गोष्टीची भीती असते. एखादा जवळचा व्यक्ती त्याला कधीच काही होऊ नये असं तुम्हाला वाटत असतं. पण स्वप्नात नेमका तुम्हाला उलटच दिसतं. त्या जवळच्या प्रिय व्यक्तीला काहीतरी झालंय किंवा अगदी त्या व्यक्तीचं निधन झालंय असं देखील स्वप्नात दिसत. आणि यापेक्षा वाईट स्वप्न दुसरं काही असूच शकत नाही. यासाठीच तुमच्या इच्छा, तुमच्या भावना आणि तुम्ही वास्तवात पाहिलेल्या घटना यातूनच हे स्वप्न पडत असावीत.

तसेच डॉक्टर्स सांगतात की, काही आजार देखील असे असतात जसे की पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि नाईट मेयर डीसोर्डर यामुळे देखील भीतीदायक स्वप्न पडतात. अशा व्यक्तींना योग्य उपचार आणि समुपदेशनाची गरज असते. त्याचबरोबर तज्ञ सांगतात की, जेव्हा एखादी व्यक्ती गाढ झोपेत असते त्यावेळी त्याच्या लॉजिकल सेंटर ऐवजी इमोशनल सेंटर अधिक कार्यरत असतो.

Share This News

Related Post

#Parenting Tips : मुलांकडून जबरदस्तीने मोबाईल काढून घेऊ नका, सवय कमी करण्यासाठी खास टिप्स

Posted by - March 10, 2023 0
#Parenting Tips : आजच्या आधुनिक काळात मोबाइल फोन ही केवळ प्रौढांसाठीच नव्हे तर लहान मुलांसाठीही एक गंभीर समस्या बनत चालली…

आज लक्ष्मीपूजन; जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचे शुभमुहूर्त

Posted by - October 24, 2022 0
आली माझ्या घरी ही दिवाळी. नरकचतुर्दशी या दीपावलीतील मुख्य सणाच्या दिवसाबरोबर आज, सोमवारी (दि.२४) लक्ष्मीपूजन हा दीपोत्सवातील उत्सव येत आहे.…

#Travel Diary : कमी बजेटमध्ये संस्मरणीय सुट्ट्या घालवायच्या असतील तर ही पर्यटन स्थळे आहेत परफेक्ट

Posted by - March 21, 2023 0
उन्हाळी पर्यटनस्थळे : मार्च महिना येताच उन्हाळा सुरू होतो. उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे लोक सुट्टीचे प्लॅनिंग करू लागतात. पण…

सिंहगड रस्त्याने येत असल्यास सावधान! सिहंगड रस्ता येथे पानमळा ते राजाराम पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने अपघाताची शक्यता PHOTO

Posted by - November 3, 2022 0
पुणे : आज सकाळी ०६•४० वाजता सिहंगड रस्ता येथे पानमळा ते राजाराम पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात ऑईल सांडले होते. अग्निशमन दलाच्या…

महाराष्ट्र दिन विशेष; काय आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा इतिहास

Posted by - May 1, 2022 0
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *