RAIN UPDATE : राज्यात तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने वीर धरण ,भामा आसखेड धरण ,आणि गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्र मध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे धरण पातळीत वाढ झाली असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे
वीर धरण
वीर धरण उजवा कालवा विद्युतगृहातुन ८०० क्यूसेक व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्यूसेक विसर्ग नदीपत्रात सुरू करण्यात आला आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून सकाळी ९ वाजता ४६३७ क्यूसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सध्या नीरा नदीपत्रात एकूण ५७३७ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
भामा आसखेड धरण
भामा आसखेड धरण जलाशय पातळी सकाळी १० वाजता ६७०.९० मी आणि एकूण पाणीसाठा (२२१.५१३ दलघमी ९५.७९ %) झाला आहे. भामा आसखेड प्रकल्पात पाण्याचा येवा सुरू आहे.
पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा बघता पूढील १० ते १५ तासात प्रकल्प ९८% होऊ शकतो . त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याचा येवा यानुसार सांडव्यावरून भामा नदीत विसर्ग सोडण्यात येणार आहे.
नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गुंजवणी धरण
गुंजवणी धरण जलाशय पातळी वाढत असून विद्युतगृहातून २०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पावसाच्या तीव्रतेप्रमाणे विसर्ग कमी/जास्त होईल. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत असे आवाहन कार्यकारी अभियंता निरा देवघर प्रकल्प विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.