आज-काल पाऊस केव्हा सुरू होईल हे सांगतात येत नाही. उन्हाळ्यात पडणारा पाऊस असो किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस असो अगदी बारा महिने पाऊस हा कधीही पडू लागला आहे. मोठ्या समस्या सोडा पण गृहिणी समोर सर्वात मोठी समस्या असते की धुतलेले कपडे वाळवायचे कसे ? चला तर मग काही अशा गोष्टी अवलंब करूयात जेणेकरून कपडे चटकन वाळतील, धुतलेले कपडे चांगले राहतील आणि घरात दुर्गंधी देखील पसरणार नाही.
कपडे ओले राहिल्यामुळे कुबट वास घरामध्ये पसरत असतो हे सर्व टाळण्यासाठी हे मुद्दे लक्षात घ्या. प्रामुख्याने पावसाळ्याचे दिवस कोणते हे आपल्याला माहीत असतं, अशावेळी तुम्ही जे कपडे पावसाळ्यात वापरत नाही ते कपडे पॅक करून ठेवून द्या. कपाटांमध्ये त्या कपड्यांची जागा कमी करा.
पावसात भिजले असाल तर ते कपडे लगेच धुण्यासाठी घ्या. साठवून ठेवू नका. पण वापरलेले कपडे जे भिजलेले नाहीत, त्यांना भिजतच घालवू नका. लक्षात घ्या कपडे टप्प्याटप्प्याने धुवायचे आहेत.
जर कपडे ओले झाले असतील तरच त्यांना कुबट वास येतो. त्यामुळे अंगावरचे कपडे कोरडे असतील तर भलेही साठवून राहू द्या पण भिजत घालू नका. जिथे पाऊस लागत नाही अशा भागात (रूम मध्ये) कपडे वाळवू शकता. तो एरिया किती मोठा आहे, याचा अंदाज घेऊनच कपडे भिजवा आणि धुवून काढा.
कपडे धुवत असताना मशीनमध्ये अर्धे लिंबू पिळून काढा किंवा हाताने कपडे धुणार असाल तर कपडे भिजत घालताना अर्ध लिंबू पिळून कपडे भिजवा यामुळे कपड्यांमधील बॅक्टेरिया नष्ट होईल आणि दुर्गंधी देखील जाईल.
पावसाळ्यात बराच वेळा कपडे धुऊन वाळवले जरी असतील तरी ते ओलसरच जाणवतात त्यासाठीच कपाटामध्ये अति कपडे कोंबू नका जे कपडे वापरत नसाल ते दान करा. जे चांगले कपडे आहेत पण पावसाळ्यात वापरत नाही त्यांना लगेचच व्यवस्थित पॅक करून ठेवून द्या. कपाट मोकळे हवेशीर राहू द्या.
पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी पंख्याखाली हमखास वाळवू शकता. या ठिकाणी तुम्ही एखादी धूप किंवा सध्या मिळणाऱ्या कप धूप हा प्रकार अवश्य लावून पहा. त्यामुळे कपड्यांना वास येत नाही. तसेच घरामध्येही वातावरण स्वच्छ आणि सुगंधित राहते.