पाकिस्तान : T20 वर्ल्ड कप मधून पाकिस्तानला अत्यंत निराशा पदरी पडली आहे. पराभवामुळे पाकिस्तानी चाहते संतापले आहेत. झिंबावे सारख्या टीमने देखील पाकिस्तानला पराभूत करावे, हा पराभव पाकिस्तानी चहात्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे T20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा पाकिस्तानचा मार्ग अधिक खडतर बनला आहे.
एकीकडे चहात्यांना हा पराभव पचवणं जितक कठीण जात आहे. तितकच क्रिकेटपटूंना देखील हे पचवणं कठीण जात आहे. शोएब अख्तरने देखील भारताच्या खेळीबद्दल मोठे विधान केले आहे. पाकिस्तानाने जी टीम निवडली आहे. त्यावरून ते पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर होतील अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. तर आता भारतासोबत देखील असंच होणार असं देखील विधान त्यांन केल आहे. पाकिस्तानची टीम या आठवड्यात मायदेशी परतेल पुढच्या आठवड्यात टीम इंडिया मायदेशी परतेल असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.