नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक पटकावून देणाऱ्या सुशील कुमारने (Sushil Kumar) दिल्लीतील तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले आहे. सुशील कुमार (Sushil Kumar) याच्यावर ज्युनियर अॅथलीट सागर धनखरचा खून त्याचबरोबर हत्येचा प्रयत्न यासह दंगल आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. गुडघ्याच्या ऑपरेशननंतर सुशील कुमार जामिनावर बाहेर होता. त्यानंतर आता त्याने पुन्हा स्वतःला तिहार जेलमध्ये सरेंडर केले आहे.
सागर धनखर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 170 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. यामध्ये सुशील कुमारला मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सुशील कुमारला 23 जुलै ते 30 जुलै या एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. वैद्यकीय कारणास्तव सुशील कुमारला हा जामीन मंजूर करण्यात आला होता.
काय आहे नेमके प्रकरण?
2021 मध्ये दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखरला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत सागर धनखरचा मृत्यू झाला होता.या प्रकरणात सुशील कुमारला (Sushil Kumar) अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सुशील कुमार आणि इतर 17 जणांविरुद्ध खून आणि गुन्हेगारी कटाचे आरोप करण्यात आले होते.