नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील खेळाडू मनोज तिवारीने सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. मनोज तिवारीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याने आशिया चषकापूर्वी (Asia Cup 2023) ही निवृत्ती जाहीर केल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
https://twitter.com/tiwarymanoj/status/1686994882559385600
https://www.instagram.com/p/CveRzImttqR/?utm_source=ig_embed&ig_rid=a1ab0797-b998-43f5-be66-d385be48e99c
मनोजने भारताकडून 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 287 धावा केल्या. यामध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. त्याने 3 टी-20 सामनेही खेळले आहेत. त्याने 141 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9908 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने त्रिशतकही ठोकले आहे. नाबाद 303 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. मनोजने या फॉरमॅटमध्ये 29 शतके आणि 45 अर्धशतके केली आहेत. त्याने लिस्ट ए च्या 169 सामन्यात 5581 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतके आणि 40 अर्धशतके केली आहेत. मनोजने इंडियन प्रीमियर लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने 98 IPL सामन्यात 1695 धावा केल्या आहेत. मनोजने जुलै 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. आणि शेवटचा T20 सामना सप्टेंबर 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.