नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लड (Ind Vs Eng) यांच्यात धर्मशालामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला आहे. या विजयामुळे भारताने 4-1 अशा मोठ्या फरकाने सिरिज जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि आश्विनच्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे.
या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना 477 धावा केल्या तसेच 259 धावांची आघाडी घेतली. भारताची ही आघाडी मोडण्यासाठी इंग्लंडचे फलंदाज मैदानात आले परंतु ते भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ टिकू शकले नाहीत. इंग्लंड करून सर्वाधिक 84 धावा जो रूट याने केल्या परंतु रूट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही.
भारताकडून 100 वी टेस्ट खेळणारा गोलंदाज आर अश्विन याने तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या तब्बल 5 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 2 विकेट्स घेण्यात यश आले. तसेच रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी PMC दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा
Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल
Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक