नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ऑस्ट्रेलिया टीम इंडिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका (IND vs AUS T20) खेळवली जात आहे. मॅथ्यू वेडच्या नेतृत्वात खेळत असलेल्या टीम ऑस्ट्रेलियाचा पहिल्या दोन सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे आजचा सामना ऑस्ट्रेलिच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकावाच लागणार आहे. तर दुसरीकडे तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानं टीम इंडिया आज मैदानात उतरेल. त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत.
मात्र यादरम्यान ऑस्ट्रलियाच्या संघामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने टीममध्ये मोठा बदल केला आहे. त्यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 6 खेळाडू बदलले आहे. त्यामुळे ऑस्ट्रलियाने कुठेतरी टीम इंडियाचा धसका घेतला का? अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे टीम इंडिया आपल्या यंग खेळाडूंसह या सिरीजमध्ये उतरली आहे. विराट, रोहितसह अनेक सिनियर खेळाडूंना या सिरीजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार स्टीव स्मिथ आणि ऍडम झंपा मायदेशी परतले आहेत. तर ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, जोस इंग्लिस आणि सीन एबॉट मायदेशी परतणार आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून टीम इंडिया हि मालिका आपल्या खिशात घालते का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली
Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या
Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर
Pooja Sawant Engaged : अभिनेत्री पूजा सावंतने जोडीदारासोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत केली मोठी घोषणा
IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?