डोई वृंदावन भक्त लोटांगण करी
तुझ्या भेटीला पायी आले वारकरी l
सोहळा भक्तीचा विठू माऊलीच्या दारी
नामघोष मुखी जय पांडुरंग हरी ll
पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठल भक्त वारकरी चैत्र यात्रा, कार्तिकी यात्रा, आषाढी यात्रा, माघी यात्रा या पैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूरला भेट देतात आणि यालाच पंढरपूर वारी म्हणतात. या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते.पंढरपूरची वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाची भक्ती गीते, नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात. वारीचा आनंद घेतला जातो. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी चा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो. एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची श्री राधारानीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते.इ. स १६८५ मध्ये तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी – वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे ठरवले.संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले, तिथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इ. स १८३० पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम कुटुंबात वाद होत होते.या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर पालखी आणि देहूहून तुकाराम पालखी अशा वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. हि जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते आणि सध्या दरवर्षी सुमारे ४३ पालखी पंढरपूरला जातात.