मनाची आंघोळ : नातेसंबंध कोणतेही असो त्यामध्ये दुरावा येणं हे क्लेशदायक असतं मग कारण कोणतेही असो मतप्रवाह विरुद्ध असणे स्वभाव न जुळणे विनाकारण एखाद्या व्यक्तीचा राग राग करणे कोणाच्यातरी यशामुळे इर्षा निर्माण होणे अशी एक ना अनेक कारणे असतात ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ लागतो
आज आपण बोलणार आहोत ते पती-पत्नीच्या नात्याबद्दल पती-पत्नीचं नातं हे एक असं नातं आहे जे रक्ताचा तर नसतं पण खऱ्या अर्थाने कुटुंब वाढवणे यासाठी हे नातं सर्वात महत्त्वाचं असतं परंतु पूर्णपणे वेगळ्या वातावरणातून एकत्र आलेल्या दोघांना बऱ्याच वेळा एकमेकांना समजून घेणे खूप कठीण होत असतं एकमेकांच्या गरजा अपेक्षा समजावून घेत असताना सोबती येणाऱ्या नात्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना चांगलीच दमछाक होत असते त्यात जर नातं नवीन असेल तर ते आणखीनच कठीण होते मग अशावेळी काय करावे हेच नेमकं आज तुम्हाला सांगणार आहे…
1. कोणत्याही नात्यांमध्ये प्रेमाचा ओलावा पुन्हा निर्माण होण्यासाठी दुरावा आवश्यक आहे हो बऱ्याच वेळा कायम सोबत असणाऱ्या व्यक्तीची किंमत हळूहळू कमी होऊ लागते त्यामुळे सर्वप्रथम स्वतःला वेळ द्या त्या नात्यापासून काही काळ दूर जा अर्थात नातं तोडून नाही तर जस्ट टेक अ ब्रेक
2. पुरुषापेक्षा एखाद्या स्त्री कडूनच अधिक अपेक्षांचा डोंगर रचला जातो घरातली काम मुलांची बाळंतपण त्यांचं संगोपन करिअर शिक्षण सर्वांचे स्वभाव आणि त्यांच्या गरजा पूर्ण करता करता स्वतःच आयुष्य जगणं प्रत्येक स्त्री विसरून जाते अशावेळी पुरुषाकडून तिला फक्त प्रेमच नाही तर त्यासह आदरभाव आणि तिच्या अस्तित्वाची किंमत करणं खूप महत्त्वाचा आहे त्यामुळेच नात्यांमध्ये केवळ प्रेम नाही तर आदराची भावना असणे खूप जास्त आवश्यक आहे
3. एकमेकांना वेळ देणं हे सर्वात महत्त्वाचा आहे आता वेळ देणे म्हणजे नक्की काय तर तुमचं स्पष्ट शुद्ध अंतकरणाने आदर आणि प्रेमाच्या भावनाने तुझ्या माझ्याकडून अपेक्षा काय आहेत हे थेट विचारणं आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे
4. समोरच्याकडून आपण जेव्हा एखादी अपेक्षा करतो त्यावेळी ती नेहमीच बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवा अर्थात मी घरात खूप काम करते याची किंमत जर त्याने ठेवावी असं वाटत असेल तर तो देखील बाहेर जाऊन परिश्रम करतो याची मला जाणीव आहे हे समजावून सांगा यातून एकमेकांबद्दल आदरभाव वाढू लागेल
5. बोलणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच योग्य वेळी शांत राहणं देखील महत्त्वाचा आहे एकमेकांचं मन वाचण्याचा प्रयत्न करा ते तितकं देखील कठीण नाही कोणत्याही कारणाने जर आयुष्याचा जोडीदार विचार मग्न असेल चिडचिड करत असेल तर प्रत्येक वेळी त्याच क्षणाला बोललं गेलं पाहिजे असं गरजेचं नसतं थोडी वेळ जाऊ द्या
6. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने तिच्यावर आणि तिने त्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्यभराचं नातं जोडलेलं असतं त्यामुळे तिच्या चुका चार चौघात किंवा त्याच्या चुका चारचौघात बोलणे पूर्णपणे बंद करा एकमेकांच्या चुका या चार भिंतींमध्ये एकमेकांशी बोलूनच कमी करून घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे इतर नाते तुमच्या मूळ नात्यांमध्ये डोकावू शकणार नाहीत