Ram Mandir Ayodhya

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासारखीच ‘ही’ आहेत भारतातील 7 प्रसिद्ध राम मंदिरे

2044 0

हिंदू पंचागानुसार, चैत्र शुद्ध नवमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण हा दिवस आपण रामनवमी म्हणून साजरा करतो. या तिथीला भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला ‘रामनवमी’ असं म्हणतात. तर रमनवमी निम्मित देशातील प्रसिद्ध राममंदिर कोणती आहेत पाहुयात…

1) अयोध्या राम मंदिर उत्तर प्रदेश
श्री रामांची जन्मभूमी असलेल्या प्राचीन व मोक्षदायिनी अयोध्या नगरीत पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर आता भगवान श्री रामांचे भव्य मंदिर उभे राहिलेले आहे. रामजन्मभूमीवरील या भव्य मंदिरात यंदा प्रथमच रामनवमीचा उत्सव होत असून, त्याचा थाट अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाराच आहे .

2) रामतीर्थम, आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशातील विझियानगरम येथे स्थित रामतीर्थम हे नयनरम्य टेकड्यांमध्ये वसलेले प्राचीन प्रभू राम मंदिर आहे. हे मंदिर 17 व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. दक्षिण भारतातील प्रभू रामाच्या चिरस्थायी वारशाचा हा पुरावा आहे. या प्राचीन मंदिराच्या बांधकामाशी आणि अस्तित्वाशी संबंधित अनेक स्थानिक आख्यायिका आहेत.

3) राम राजा मंदिर, ओरछा, मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील ओरछा या ऐतिहासिक शहरात वसलेले राम राजा मंदिर हे सर्वात पुरातन प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील कोरीव काम वास्तुकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. 16 व्या शतकात बुंदेला राजपूतांच्या कारकिर्दीत बांधलेले हे मंदिर आहे. भगवान आणि राजा या दोन्हींच्या रूपात श्रीरामाची पूजा केली जाणारे हे एकमेव मंदिर आहे.

4) रघुनाथ मंदिर, जम्मू आणि काश्मीर
जम्मूमधील टेकडीवर वसलेले रघुनाथ मंदिर हे प्रभू रामाला समर्पित एक प्राचीन मंदिर आहे. हे राज्य आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी जितके प्रसिद्ध आहे, तितकेच प्रसिद्ध इथले रामाचे मंदिर आहे. हे मंदिर एक आध्यात्मिक विश्रामाचे एक केंद्र आहे, जेथील भाविकांना शांत वातावरणात देवाची भक्ती करता येते.

5) रामनगर किल्ला मंदिर, वाराणसी
वाराणसी हे भारताचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. येथील रामाचे रामनगर किल्ले मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. बनारसच्या महाराजांनी 18 व्या शतकात बांधलेले ऐतिहासिक किल्ल्याच्या संकुलात हे मंदिर बांधले आहे. त्यामुळे गंगेच्या गजबजलेल्या घाटांपासून दूर आरामाच्या शोधात असलेल्या यात्रेकरूंना हे मंदिर आकर्षित करते.

6) राम तीरथ मंदिर, अमृतसर, पंजाब
पंजाबमधील अमृतसर येथे स्थित राम तीरथ मंदिर भगवान राम आणि सीता यांच्या पुत्र लव आणि कुश यांच्या जन्माशी संबंधित आहे. हे मंदिर त्याच्या प्राचीन विहिरीसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये उपचार शक्ती असल्याचे मानले जाते. लंका जिंकल्यानंतर वाल्मिकी ऋषींनी माता सीतेला आश्रय दिला ते हेच ठिकाण आहे.

7) रामजी मंदिर, कानपूर
कानपूर शहराच्या मध्यभागी रामजी मंदिर आहे, जे शहराच्या औद्योगिकीकरणापूर्वीचे जुने मंदिर आहे. शहरी गजबजाटात आध्यात्मिक शांतता मिळवण्यासाठी भक्त या मंदिरात येतात.

8) सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा
गोदावरी नदीच्या काठावर स्थित, भद्राचलममधील सीता रामचंद्रस्वामी मंदिर आहे. हे मंदिर 17 व्या शतकातील आहे. मंदिर परिसर रामायणाच्या महाकाव्याचे आणि त्यासंबंधित गोष्टींचे शिल्प आहेत. या मंदिरातील कोरीव काम अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

UPSC Results : पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश

Pune Crime : धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Pune University : एक भेट पुणे विद्यापीठाला; विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी..!

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

IND Vs AUS Women Cricket

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Posted by - December 24, 2023 0
मुंबई : टीम इंडियाच्या महिलांनी आज इतिहास रचला आहे.मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात (IND Vs AUS Women Cricket) भारताने ऑस्ट्रेलियाचा…

पंढरपुरातील शासकीय महापूजेचा काय आहे इतिहास ?

Posted by - July 10, 2022 0
महाराष्ट्रात वारीची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी मैलोनमैल प्रवास करत वारीत सहभागी होतात आणि…

इलेक्ट्रिक हायवे म्हणजे काय ? भारतामध्ये कुठे बांधला जाणार ? जाणून घ्या

Posted by - April 6, 2022 0
इलेक्ट्रिक हायवे- देशात सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे हैराण झालेल्या लोकांसाठी भारत सरकारने मोठी बातमी आणली आहे. ही…

बालाकोट एअर स्ट्राईकला 4 वर्षे : पुलवामा हल्ल्यानंतरच बालाकोट स्ट्राईक; भारतीय लष्कराच्या सूडाची संपूर्ण कहाणी

Posted by - March 3, 2023 0
बालाकोट एअर स्ट्राईकच्या नावामुळे भारतीय लष्कराच्या ४ वर्षांपूर्वीच्या शौर्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 4 फेब्रुवारी 26 रोजी भारतीय हवाई दलाने…

गुगलची नवीन घोषणा तुमच्यासाठी महत्वाची आहे, जाणून घ्या

Posted by - May 2, 2022 0
नवी दिल्ली,- गुगलने नवी मोठी घोषणा केली आहे. गुगल सर्चमधून फोन नंबर, ईमेल, अॅड्रेस हटवण्यासाठी परवानगी दिली आहे. लोकांच्या संवेदनशील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *